नमस्कार आज आहे २९ मे २०२५.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
आज मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देणार आहे,सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, आज आहे 29 may 2025, अजून ३० तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे.
त्याच्यानंतर राज्यामध्ये 7 june पासून परत राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून हा लक्षात घ्यायचा, 7 जूनला वाढणार, 8 जूनला त्याच्यापेक्षा वाढणार, 9,10,11 असा वादहत वाढत जाणार आहे.
एवढे दिवस वारे सुटणार
उद्या 30 may पासूनच राज्यात वारे सुटायला सुरुवात होईल, असं जोराचं वारं वाहील,म्हणजे ते वारं जवळपास 5-6 जूनपर्यंत चालेल आणि 7 तारखेला राज्यामध्ये ठिकठिकाणी भाग बदलत पावसाला सुरुवात होणार आहे.
या भागात जास्त पाऊस – पंजाब डख
सांगायचं झालं तर तो पाऊस, पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी जास्त प्रमाणात राहणार आहे व उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस राहणार आहे, म्ह्णून हे देखील लक्षात घ्यायचं.
३ १ may 2025 पासून ते complete 6 june 2025 पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे, सूर्यदर्शन घडणार आहे, म्ह्णून हे देखील लक्षात घ्यायचं.
पेरणी कधी करायची ?
पण, सर्वांसाठी आनंदाची बातमी 31 may पासून ते 5 june पर्यंत ज्याचं शेत तयार असेल, ते पेरणी करायची असेल तर, करू शकता.
ज्यांचं शेत वापस असेल तर, तुम्ही तुमची जमिनीची ओल पाहून पेरणी करू शकता, लागवड करायची तर, कापसाची लागवड असेल तर, बियाण्याला टोचून लावू शकता, कारण कि टोचून लावल्याच्या नंतर, जरी पाऊस नाही पडला तरी, ती सरकी उगवते, हे लक्षात घ्यायचं.
शेत दुरुस्त असेल तर तुम्ही तुमच्या जमिनीची ओल पहा, पेरणी होत असेल तर पेरा म्हणजे मूग,उडीद पेरायचा जमू शकतं, फक्त सोयाबीन पेरल्यानंतर त्याला एखादा पाऊस लागतो, कापूस लागवड करायची असेल तर, टोचुन लावा.
अचानक वातावरणात बदल झाला तर, लगेच उद्या एक अंदाज देण्यात येईल, धन्यवाद.