
नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि लाभार्थ्यांनो, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल मिळवू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.
नवीन परिपत्रक जारी
कृषी भवन, नवी दिल्ली येथून 4 जून 2025 रोजी जाहीर झालेल्या परिपत्रकानुसार, आवास प्लस 2024 च्या सर्व्हे अंतर्गत नवीन अर्ज करण्याची अंतिम तारीख आता 18 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
कोण पात्र आहेत?
- जे लाभार्थी घरकुल योजनेसाठी अर्ज करू इच्छित होते पण काही कारणास्तव वंचित राहिले.
- ज्यांचे जॉब कार्ड किंवा आधार कार्डमध्ये अडचण होती.
- जे बाहेरगावी होते किंवा यापूर्वी उपस्थित राहू शकले नाहीत.
अर्ज करण्यासाठी आवश्यक गोष्टी
- वैध जॉब कार्ड
- अपडेट केलेले आधार कार्ड
- अन्य आवश्यक कागदपत्रे
किती घरकुल मंजूर?
केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार, देशभरात 10.29 लाख घरकुल मंजूर झाली आहेत.
यामध्ये महाराष्ट्रासाठी तब्बल 40,70,829 घरकुल मंजूर करण्यात आली आहेत, जे 2025 ते 2029 या कालावधीत तयार केली जातील.
सरकारचा उद्देश
“एकही बेघर नागरिक घरकुल योजनेपासून वंचित राहू नये” हे केंद्र सरकारचे स्पष्ट धोरण आहे. त्यामुळे 2025 मध्ये सर्व नवीन पात्र लाभार्थ्यांनी ही संधी वाया जाऊ न देता अर्ज करणे आवश्यक आहे.
ही माहिती आपल्या नातेवाईक, मित्र आणि गावातील इतर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जर तुम्ही अजूनही अर्ज केले नसेल, तर आजच करा, धन्यवाद.