नमस्कार शेतकरी बांधवांनो !
आज 31 मे 2025 रोजी सूर्यदर्शन झाले असून राज्यभर कोरडं हवामान सुरु आहे. हा हवामानाचा बदल म्हणजे तुमच्यासाठी शेतीची तयारी करण्याची उत्तम संधी आहे.

31 मे ते 6 जून अंदाज
- शेतकरी बांधवांनी 31 मे ते 6 जून दरम्यान शेतीसंबंधित कामे पूर्ण करून घ्यावीत.
- शेत दुरुस्त करा, पेरणीसाठी शेती तयार ठेवा.
- या काळात हळदी, मूग, उडीद पेरणीस योग्य हवामान आहे.
- जिथं जमिनीत किमान 1 फूट ओल आहे, तिथं नक्कीच पेरणी करा.
7 जून ते 10 जून – पावसाची सुरुवात
- 7 ते 10 जून दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस पडणार आहे.
- पाऊस हळूहळू भागानुसार बदलत राहणार आहे.
- यानंतर हवामान आणखी ओलसर होणार आहे.
13 जून ते 17 जून – जोरदार पावसाचा अंदाज
- या कालावधीत मुसळधार पाऊस पडणार आहे.
- नाले वाहतील असा पाऊस होणार असून, ही पेरणीसाठी अत्यंत महत्त्वाची वेळ आहे.
- संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं जोरदार आगमन होणार आहे.
जून अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पेरणी पूर्ण
- अंदाजानुसार जूनच्या शेवटपर्यंत सर्व भागांत पेरणी पूर्ण होणार आहे.
- कोणीही पावसाअभावी पेरणीपासून वंचित राहणार नाही.
- शेतकरी बांधवांनी योग्य वेळ साधून योग्य पीक निवडून पेरणी करावी.
स्वतःचा निर्णयाचे स्वतः घ्या
- पेरणीचा निर्णय स्वतः घ्या. जमिनीत ओल किती आहे, याचा विचार करा.
- हवामानात अचानक बदल झाल्यास, त्वरित माहिती दिली जाईल.
कोणत्या भागात कधी पाऊस?
- नंदुरबार, धुळे, मालेगाव, जळगाव – 3-5 जून दरम्यान हलका पाऊस.
- कोकण, कोल्हापूर – 31 मे ते 6 जून दरम्यान सरीसरीचा पाऊस.
- कोठेही पाऊस एकदम थांबणार नाही – थोड्या प्रमाणात सरी चालूच राहतील.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
- शेत तयारी 6 जूनपर्यंत पूर्ण करा.
- 7 जूनपासून पावसाची सुरुवात होत असल्याने उशीर करू नका.
- पेरणीची तयारी ठेवा आणि हवामानाच्या अंदाजावर सतत लक्ष ठेवा.